<p>गुढीपाडवा, नवरात्र, चेटीचंद आणि उगादीच्या शुभेच्छा देत Shivraj Singh Chouhan यांनी जळगावमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.</p><p>अमळनेर दौऱ्यात ‘सुपोषण अभियान’ अंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. जळगाव हा देशातील प्रमुख केळी उत्पादक जिल्हा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.</p><p>शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ₹200 कोटींचा ‘Banana Cluster Project’ मंजूर करण्यात आला असून, यामध्ये लागवड, प्रक्रिया, निर्यात, कोल्ड स्टोरेज आणि ripening chambers यांचा समावेश असेल.</p><p>युद्धस्थितीमुळे आणि बाजारातील समस्यांमुळे निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.</p><p>#ShivrajSinghChouhan #Jalgaon #Agriculture #Maharashtra #Farmers #AsienetNewsMarathi #politics</p>
